Home Uncategorized जिल्हाधिकारी यांनी दिला सायकल चालवण्याचा संदेश

जिल्हाधिकारी यांनी दिला सायकल चालवण्याचा संदेश

72
0

संडे सायकलिंग ग्रुपला सात वर्षे पूर्ण : पर्यावरण वाचवा आरोग्य सुदृढ ठेवण्याचा देत आहे संदेश

गोंदिया : शहरातील काही युवक- युवतीने मिळून 18 जून 2017 ला दर रविवारी सायकल चालवण्याच्या संकल्प केला आणि त्याद्वारा ‘संडे सायकलिंग ग्रुप’ ची निर्मिती करण्यात आली. आज अविरतपणे या ग्रुप द्वारा ‘एक दिन सायकल के नाम’.. असे ब्रीद वाक्य घेऊन सात वर्ष पूर्ण झाले आहे. ‘सायकल चालवा.. पर्यावरण वाचवा.. आणि आरोग्य सुदृढ ठेवा’ हा संदेश देत सायकल चालवण्याच्या अभिनव उपक्रम सुरू ठेवला असुन आज या सायकलिंग संडे ग्रुपला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सुद्धा चालवण्याच्या या उपक्रमामध्ये सहभागी झाले. आज रविवार, 16 जून रोजी सकाळी 6 वाजता रेलटोली गुरुद्वारा येथून या सायकलिंगला सुरवात करण्यात आली. यावेळी सायकलिंग ग्रुपला हिरवी झेंडी गोंदिया विधान सभा व्हॉट्सॲप ग्रुपने दाखवली व सायकलिंगला सुरवात करण्यात आली. गुरुद्वारा ते नागरा येथील शिव मंदिर पर्यंत व तिथून पुन्हा गोंदिया येथील विश्रामगृहपर्यंत सायकल चालविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले की सायकल  चालवा.. पर्यावरण वाचवा.. आणि आरोग्य सुदृढ ठेवा, हा संदेश दिला. या सायकलिंग संडेच्या वर्धापन दिनानिमीत्त जिल्हाधिकारी तसेच सायकलिंग संडे ग्रुपचे अध्यक्ष मंजु कटरे, सचिव रवि सपाटे व कोषाध्यक्ष विजय येडे यांनी केक कापून वर्धापन दिन साजरा केला. आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर आज प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे दुचाकी, चारचाकी यांच्या मोठ्या प्रमाणात वावर झाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होत असतो. त्यामुळे येणाऱ्या पिढीला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून गोंदियातील युवक युवती आणि वयोवृद्ध यांनी समोर येऊन ..एक दिन सायकल के नाम.. संडे सायकली ग्रुपची निर्मिती केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर युवक- युवती आणि वयोवृद्ध सुद्धा सहभागी झाले. एक दिवस सायकल चालवून गोंदिया जिल्ह्यात विविध गावांमध्ये शहरांमध्ये फिरून प्रत्येक रविवारी 20 ते 25 किलोमीटर सायकल चालवून.. पर्यावरण वाचवण्याच्या संदेश देत तसेच आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी अविरतपणे 7 वर्षापासून कार्य करत आहेत. या संडे सायकल ग्रुपला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुद्धा सायकल चालवत या उपक्रमामध्ये सहभागी झाले आणि सर्वांनी आपल्या आरोग्य आणि हृदय चांगले ठेवण्यासाठी सायकल चालवावी. त्यामुळे मानवाचे आरोग्य तर चांगलं राहिलंच पण एक दिवस सायकल चालवण्याने पर्यावरणाचे सुद्धा रक्षण होईल. या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सायकलिंग मध्ये जिल्हाधिकारी, मंजु कटरे, रवि सपाटे, विजय येडे, जितेंद्र खरवडे, अजित शेनमारे, 82 वर्षीय मुन्ना यादव, अरुण बंनाटे, दीपक गाडेकर, नवीन दहीकर, आर्यन कुंभलवार , हितेंद्र खरवडे, आशा तिडके, श्रद्धा यादव, दिपाली वाढई, त्रिवेणी उके, पुष्पा घोडेस्वार, भूमी खटवाणी, कृष्णा शेंडे, नरेंद्र बेलगे, साहिल खटवानी, प्रवीण हालानी, विजय सोनी, बीएच जिवानी, संदेश घरडे, कवल गुलाटी, हितेंद्र खरवडे, पियूष जैन, सत्यवीरसिंग बीसेन, ओम हरिणखेडे, निर्वाण सर, कनक सेलारे, हिरवळ ग्रुपमधील विक्की शहारे यांनी सहभाग घेतला.